"प्रेम लपवायला हवे होते का मी? प्रेम व्यक्त केल्यानी, नकळत एक दुराव्याची भिंत बांधली गेली आहे. भेटायच्या आधी आतुरता आणि भेटल्यावर जीवघेणी शांतता. बरेच प्रश्न पडलेत मला ह्या भेटी नंतर.! बरेच झाले भेटलोत, शांतता शेअर केली आणि ही शांतता खुप जीवघेणी वाटली - नकोशी वाटली. दोन-तिनदा तर तिथून उठून घरी परत जावेसे वाटले, का वाटले ते माहिती नाही, तुझ्याकडून तर काही अपेक्षा पण ठेवली नव्हती, तू भेटायला येणेही मला धक्काच होता.
या वेळी भेटताना माझ्यातली मी ती नव्हती जी तुझ्या प्रेमात पडली होती. जे बघू तेच दिसतं, प्रत्येकदा तुझ्यात प्रेम शोधायची आणि कदाचित ते दिसायचही. पण आता जे समोर होते तेच बघीतले, जो तू होता तोच दिसला, अगदीच शुष्क वाळवंटा सारखा..!
या भेटीनंतर मनापासून वाटले, मला वाळवंट कसा आवडू शकतो? खरचं माझे तुझ्यावर प्रेम होते का.? की फक्त प्रवाहात वाहुन जाताना मी आकर्षणाला प्रेम समजली.? काही दिवस खरच प्रेम काय हे समजून प्रेम व्यक्त करायला हवे होते का? पण प्रेम अनुभव न घेता समजतं का.? माझं-तुझ्यावर प्रेम नाही हे तरी खरं आहे का? प्रेम असतं तर, मी, माझे शब्द, माझी नजर आणि आपल्यातली शांतताही इतकी शुष्क जीवघेणी वाटली असती का? तेव्हा प्रेम लपवले असते तर मला आज पुन्हा नव्याने प्रेमाचा शोध घ्यावासा वाटला असता का.? प्रेम तरी शोधल्यानी सापडतं का.? आणि सापडलं तेच प्रेम असते हे तरी कशावरुन.?
सांग कधी तरी, मी प्रेम लपवायाला हवे होते का.?"
good 1!!!!!!!!!!!1
ReplyDelete