“कोण म्हणत प्रेम एकदाच होत..!!”, बहुदा ती पुन्हा प्रेमात पडली होती आणि हे ती त्याला खूप उत्सुकतेने सांगत होती.. “मी पुन्हा प्रेमात पडली रे..!! मला आवडला तो..!!”
आज असं काही ऐकायला मिळेल याची त्याला कल्पनाही नसेल, तो गोंधळला होता खरा! पण गोंधळ लपवून म्हणाला, “मी तर आधीच म्हटलं होत, प्रेम खुपदा होऊ शकते, तुलाच पटत नव्हते ते..!! बर..!! ते सोड, कोण आहे तो..??”,
त्याच्या याच प्रश्नाची ती वाट पहात होती आणि तिला आवडणाऱ्या त्याची कहाणी अगदी भान हरवून सांगायला लागली..!!
तिची बडबड तो ऐकत होता, मध्ये मध्ये ‘अरे वा..!!’, ‘छान’, ‘अच्छा’ अशे प्रतिसाद द्यायला तो विसरत नव्हता..!!
***
नंतर काही दिवसांनी..!!
***
त्या दोघांमध्ये पुन्हा तिला आवडणाऱ्या त्याचा विषय निघाला. तेव्हा त्यानीच तिला विचारले होते, “काय म्हणतो तुझा तो..??”
ती, “अरे, काही नाही आकर्षण होतं ते, तो आधीच committed आहे..!! सोड, त्याचा विषय नको..!!”
तो, “आता आकर्षण का..!! त्या दिवशी तर उड्या मारत होती, आवडला वैगेरे...!! काय झाल..??”
ती, “आकर्षण आणि प्रेम यातला फरक ओळखण्यात चुकली होती, आता होतात माणसांकडून चुका..!!”
तो, “तुला काय माहिती आहे, तो आवडतो सांगितले तेव्हा किती वाईट वाटलं मला, रडलो मी..!!”
ती, “आईंग..!! रडला..?? तुला काय वाईट वाटलं..?? काही पण बोलायचं म्हणून बोलू नको..!!”
तो, “हो, आता काही पण..!! हवं तर माझ्या मित्राला विचार, देऊ का फोन त्याला,विचारते का..??”
ती, “नाही.. नाही... नको..!! पण तुला का वाईट वाटलं...??”
तो, “तुला propose करणार होतो मी..!! पण तू सांगितलं कि तुला दुसर कुणी आवडलं, मग विचार बदलवला मी..!! सर्व plans केले होते..!!”
आता ती गोंधळली होती,हृदयाचे धडधडने अधिक वाढले होते,तो काय बोलतोय कळत होत पण वळत नव्हतं..!!
ती, “खोटं नको बोलू..!!”
तो, “खोटं काय त्यात!! करणार होतो पण आता नाही करणार..!”
ती, “बस होते ना..!! थांबव आता..!! किती खोटं बोलणार आहेस..??”
तो, “तुला खोट वाटतंय त्याला मी काय करू..?? हवं तर सर्व plans सांगू..?? काय काय करणार होतो सांगू..??”
ती, “नाही काही नको सांगू..!! फक्त तू खोटा बोलतोय,इतकच म्हण एकदा..!!”
तो, “अरे..!! पण मी खोटं बोलतच नाही आहे ना..!!”
तिच्या भावनांची मात्र पूर्ण धांदल उडाली होती.
ती, “उद्या भेट तू मला, तेव्हा direct बोलू..!!”
तो, “हो, भेटतो..!!”
ती, “हम्म..!!”
तो, “तसं तर मी पुन्हा प्रो नव्हतो करणार पण उद्या भेटतोच आहे तर..” त्याचे वाक्य अर्धे तोडीत,
ती, “तर.. काय तर..?? आधी भेटायला यायचा तसाच ये..!!”
तो, “ मी उद्या विचारणार आहे तुला, विचार करून ठेव.. आजची रात्र आहे तुझ्या जवळ..!!”
ती शांतच.. खूप शांत..
तो, “ठीक आहे न..?”
ती, “ नाही, काहीच ठीक नाही आहे..!!”
तो, “तुला रात्रही कशाला पाहिजे, आत्ताच सांग ‘हो’ कि ‘नाही’ ते..!!”
ती, “नाही..!!” आणि न पानवताच डोळ्यातून गळणाऱ्या आसवाकडे समोरच्या आरशात खिन्न पाहत राहिली..
तीच नाही ऐकून, तो, “विचार कर बर एकदा..!!”
ती, “नाही.!!”
तो, “नक्की न..!!”
ती, “हो..!! नक्की नाही.!!”
तो, “ठीक आहे..!!”
ती, “ ऐक न..!! फक्त एकदा माझ्यासाठी म्हण तू सर्व खोटे बोललास..!! मुळात तू काही बोलालच नाहीस, मी काही ऐकलेच नाही..!!”
तो, “अरे seriously घेऊ नको मला.. मी मज्जाक करत होतो, गंमत होती ती..!!!”
तेव्हा नि:श्वास टाकून तिनी cl ठेवला खरा..!! पण त्यानंतरची ती रात्र, त्यानंतरचे भेटणे सर्व संदर्भच बदलले होते दोघांत, त्याच्या साठी नाही कदाचित पण तिला ही मज्जाक भारी पडली..!! अगदी आयुष्य बदलून टाकेपर्यंत..!
तिची ही गोष्ट लिहिताना मलाही खूप प्रश्न पडले, तिनी तेव्हा “हो” म्हटलेच असते तर..!! तर त्यानी काय केले असते...?? तेव्हाच्या तिच्या भावनांची कदर तो करू शकला असता..?? अशी जीवघेणी मज्जाक कुणी कुणासोबत कशी करू शकते..?? प्रेमाचा विषय असा गंमत म्हणून घेण्यानी त्याला तरी काय मिळालं असेल..??