“मी आजही विचार करते. मी स्पष्ट त्याच्या बद्दल सांगितले, तेव्हा नेमके तुझ्या मनात काय आले असेल..!! तरीही तू मला का स्वीकारलस..! आपल्या लग्नाला १० वर्ष पूर्ण झालीत आणि लग्नानंतर मी तुझ्याशीच नेहमी प्रामाणिक होती, हे जेवढे सत्य आहे तितकेच हेही कि मी माझं पाहिलं प्रेम विसरू शकली नाही. आणि तुलाही मी या गोष्टी पासून अनभिज्ञ ठेवले नाही. सांग ना का स्वीकारलस मला..?? मी जशी आहे तशी स्वीकारणारा तू मला लग्नाच्या इतक्या वर्षा नंतरही मात्र अनोळखीच आहेस का..?”, का जाने रमा ला आज बुचकळ्यात पडल्या सारखा भास झाला म्हणून ती राजेश शी बोलत होती..
“का झालेल्या गोष्टीत रमतेस रमा..!! तू त्याला विसरली नाहीस आणि हे तू कधीच लपवले नाहीस हेच मी तुला स्वीकारण्या मागचे मोठ कारण आहे. जी मुलगी खोटे पणावर नात न बांधता आधीच सर्व स्पष्ट सांगते तीच माझ्या साठी अगदी योग्य राहील हे मला तेव्हा समजत होते आणि म्हणूनच मी तुझ्याशी लग्नाला होकार दिलं. आणि बघ चाललाय ना संसार सुरळीत..!!”
“आज त्याचा वाढदिवस आहे म्हणून आठवण झालीय का तुला..? हव असेल तर call करून बोल त्याच्याशी, बर वाटेल तुला..!!”,तो.
“फक्त आठवण आली, आठवणी येतात त्या आणल्या जात नाही. call वैगेरे करण्या एवढी उतावीळ झाली नाही मी..!! तेव्हाही आणि आजही तू माझ्यावर विश्वास का दाखवतोस..??”,ती.
“कारण मी तुझ्या प्रामाणिकपणाच्या प्रेमात पडलो होतो आणि प्रेम विश्वासावर टिकत हे तरी मला माहित आहे..! मी विश्वास ठेवला आणि तो सार्थकी गेला यात मी आयुष्य मिळवलं..!!”, तो शांत बोलत होता.
“मी त्याची आठवण काढून तुला दुखावले का रे..?”, राजेश गंभीर झाल्यासारखा वाटल्याने रमाने विचारले.
“नाही, नाही. तुझ मन समजतो मी..”
“ तू मला त्याच्या आधी का नाही भेटलास..?? मी तुझ्यावर खरच मनापासून खूप प्रेम करते. प्रेम पुन्हा करता येत रे, पण पहिल्या प्रेमाच्या गाठी मनात घट्ट घर करून असतात..!!”,ती.
“ती गाठ सैल पडून सुटण्याएवढ प्रेम करायला अजून काही वर्ष सोबत आहोत आपण..!!”, तो.
“I am Sorry..!”,ती.
“Don’t Be.. तू कुठेही चुकलेली नाहीस.. तुझी कर्तव्ये नेहमीच पूर्ण केलीस.. आणि आत्ताच बोललीस ना तू कि माझ्यावर प्रेम करतेस.. आणखी काहीही नकोय मला.!”,तो.
हे ऐकल्यावर डोळ्यातले अश्रू लपवण्यासाठी ती त्याच्या मिठीत शिरली..!
No comments:
Post a Comment