“काय ठरवलंय मग तू..?? दोन दिवसापासून वाट पाहतोय मी तुला भेटायची..!” भेटायला आल्या-आल्या रवी त्याची नाराजी व्यक्त करत होता..
“नाही रे रवी..!! इतका मोठा निर्णय मला सहजासहजी नाही जमणार.!!”, स्वाती शब्दांची जुळवाजुळव करून बोलत होती..!!
“का नाही..?? विश्वास नाही माझ्यावर..?? कि प्रेम संपल माझ्यावरचे..??” त्याच्या बोलण्यातून राग स्पष्ट दिसत होता..
“घरचे आपल्या लग्नाला तयार होणार नाहीत, हे आपण दोघांनी ठरवलंय- घरच्यांनाही न विचारता..!! आपण हे ठरवतोय कारण आपण आपल्या घरच्यांना ओळखतो; त्यांचे स्वभाव, तत्व आणि संस्कार आपल्याला माहिती आहे. म्हणून आपण ठरवतोय कि पळून जाऊन लग्न करूयात..! बरोबर..??”
“पण खरच सांग तुला योग्य वाटतोय का आपला निर्णय..?? पटतंय का आपलं पळून जाणं..?? मला हा भ्याडपणा वाटतोय.. मला वाटतय आपण एकदा घरच्यांशी बोलायला हवंय..!! त्यांना नाहीच पटणार पण त्यांना विश्वासात घ्यायला काय हरकत आहे..!!”
“आपण पळून जाऊ..!! लग्न करू..!! काही दिवस गोडी-गुलाबीनी राहू.!! पण घरच्यांना न सांगता किंवा घरच्यांना विश्वासात न घेता आपण संसार उभारलाय ही गोस्ट आपल्याला समाधानाने जगू देईल..??”
“आपल्याला पंचवीस-तीस वर्ष सांभाळणाऱ्या आई-बाबांवर आपल्या या निर्णयाने का बितेल हा तरी विचार केलास का..?? आज समजून-उमजून घरच्यांना पटवून आपलं लग्न होण्याची काही तरी शक्यता आहे..!!पण जर त्यांना अंधारात ठेवून आपण लग्न केलं तर ते आपले चेहरेही मरेस्तोवर पाहणार नाही, हे तरी माहिती आहे ना तुला..??”
“मी तुझ्यावर आजही प्रेम करते सोन्या..!! पण तुझ्या सोबत पळून जाऊन लग्नाचा निर्णय घेण मला काही पटत नाही आहे..!! मी काय बोलतीये हे समजतंय का तुला..?? एकदा घरच्यांशी बोलूयात का मग आपण..??” रवीचा हात हातात घेऊन ती त्याला समजावत होती..
“तुझं बरोबर आहे स्वाती, उगच जोश मध्ये निर्णय घेत होतो मी..!! आणि काही कारण नसताना चिडलो तुझ्या वर..!! sorry..!!”, तो अगदी प्रामाणिकपणे त्याची चूक काबुल करून बोलला..!!
“ठरलं तर मग..!! मी हळूहळू आईशी बोलते, तू पण घरी बोल..!! स्वीकारतील रे ते आपल प्रेम..!”, ती आनंदून बोलत होती..!!
तिच्या उत्साही चेहऱ्याकडे बघून रवी ही आनंदी झाला होता..!!
No comments:
Post a Comment